,( पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)
बेलसर (ता. पुरंदर) येथे बायोगॅस टाकी स्वच्छ करताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत कामगार उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते.
टाकी स्वच्छतेसाठी आत उतरलेल्या कामगारांना अचानक गुदमरल्यामुळे बेशुद्धी आली. मदत पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. योग्य सुरक्षा साधनांचा अभाव आणि नियमांचे पालन न केल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा सुरू आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























