सासवड (वार्ताहर अशोक कुंभार,)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह करून सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक लढा उभारला. या सत्याग्रहाने वंचित समाजाला मूलभूत हक्क मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला.
या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाड येथील लढ्याची आठवण जागवून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. सासवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
.
कार्यक्रमास रिपाइं नेते विष्णूदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनिलतात्या धिवार, डॉ. विनायक गायकवाड, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनिल जगताप, सचिव कैलास धिवार, पत्रकार अशोक कुंभार, अनिरुद्ध दोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून दिलेल्या समानतेच्या लढ्याची प्रेरणा घेऊन समाजात समता व बंधुता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























