- ,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)
पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) : पांगरी ते हरगुडे डोंगराच्या कुशीतून गेलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर रस्त्याचे काम जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे यांनी घेतलेल्या कंत्राटातून करण्यात आले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पांगारे व हरगुडे येथील ग्रामस्थांनी संबंधित कामाची चौकशी करून रस्ता पुन्हा नव्याने व चांगल्या दर्जात तयार करून द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
दरम्यान, शासनाने या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडू अण्णा काकडे यांनी दिली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























