(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)
पुरंदर तालुक्यातील पांगारे गावाशेजारी असलेल्या खेंगरेवाडी (वीस घरांची वस्ती) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज, बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात सांगता झाली.
संपूर्ण आठवडाभर हरिनामाच्या गजरात गाव दुमदुमून गेले होते. काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन आणि कीर्तन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक आनंद दिला. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सप्ताहाची सांगता ह.भ.प. दिलीप महाराज कदम यांच्या काल्याच्या प्रभावी कीर्तनाने झाली. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. कीर्तनादरम्यान भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सप्ताहामुळे गावात धार्मिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आयोजकांनी सर्व भाविकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















