आळंदी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर घुंडरे)अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे सिद्धबेट परिसरात “अजिंक्य वन महोत्सव अभियान” अंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमात आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, उंबर, बेल आणि कडुलिंब अशा विविध भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.
उपक्रमाचे मार्गदर्शन अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारूक सय्यद आणि
आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले.
या श्रमसंस्कार शिबिरात डॉ. एस. एम. खैरनार, डॉ. पल्लवी खरात, डॉ. निलेश माळी, डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, डॉ. कांचन वैद्य, डॉ. जगन्नाथ गावंडे, प्रा. रियाज काझी, श्री. गोरखनाथ देशमुख, डॉ. नागेश शेळके, डॉ. प्रमोद वडते, अर्जुन मेदनकर, योगेश महाराज वाघ, कैवल्य टोपे, रोहिदास कदम, पितांबर लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप बाळासाहेब घुले व महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
वृक्षारोपणावेळी डॉ. कमलजीत कौर म्हणाल्या,
“आपल्या परिसरात वाढणारी, सावली देणारी आणि पक्ष्यांना आसरा मिळवून देणारी भारतीय प्रजातींची झाडे लावण्याची गरज आहे. पर्यावरण समतोल आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे.”
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतल्यामुळे सिद्धबेट परिसर हरिततेकडे वाटचाल करत आहे. 🌱

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























