🗳️ निवडणुकीच्या तयारीत राज्यभरात हालचाल वेग
/ पुणे राजगुरुनगर: राहुल खैरे)
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल अखेर वाजणार असून राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ६ किंवा ७ नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी – भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (शिंदे गट व उद्धव गट) – यांनी आपल्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत.
📍 राजकीय घडामोडी वेगात
अनेक ठिकाणी उमेदवार निश्चितीची चर्चा सुरू.
पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, बॅनरबाजीला सुरूवात.
ओबीसी आरक्षण व वॉर्डरचना प्रश्नावर अजूनही काही ठिकाणी गोंधळ कायम.
निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत नाराजी व गटबाजी समोर येत आहे.
🏛️ महानगरपालिका निवडणुका जानेवारीत
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कोल्हापूरसह सर्व महानगरपालिकांसाठी मतदान जानेवारी १५ ते २० दरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुका होताच राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
💬 जनतेची उत्सुकता वाढली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच जनतेच्या समस्या, विकासकामे आणि स्थानिक नेतृत्वाचा कस पाहण्याची वेळ असते.
पाच वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका जाहीर होताच संपूर्ण राज्यात राजकीय तापमान चढलेले दिसत आहे.
📅 मानव मित्र NEWS | विशेष प्रतिनिधी रिपोर्ट
“जनतेच्या मनातील उमेदवार कोण?” – यावर आता सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























