मुंबई प्रतिनिधी रवि कदम
मराठा आंदोलन : मुंबईत टपरी-हॉटेल बंद, शौचालयांनाही कुलूप; आंदोलनकर्त्यांचे नागरिकांना आवाहन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र वळण लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शौचालयांनाही कुलूप लावण्यात आले असून आंदोलनकर्त्यांना मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या आहेत.
तरीही “मराठा आटणार नाही” या निर्धाराने मराठा बांधव आपला संघर्ष सुरू ठेवत आहेत. आंदोलनकर्त्यांनी एकमेकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा स्वतःच्या संगतीने व्यवस्थापित केल्या आहेत.
याचबरोबर मुंबईकर नागरिकांना निवेदन करत आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात आपण थोडी गैरसोय सहन करून आम्हाला साथ द्या,” अशी विनंती आंदोलनातून करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जे सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल तेच आमचे कायमचे सरकार राहील.”
👉 मराठा आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पुढील काही दिवसांत या चळवळीला आणखी मोठा आकार येण्याची चिन्हे आहेत.
आझाद मैदान ते वाशी पनवेल पूर्ण आंदोलकांनी जाम झाला आहे जिकडे बघावे तिकडे मराठा आरक्षणच्या वाहनांच्या रंगाच्या रांगा लागल्या आहेत सरकारला विनंती आहे लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावी

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















