आळंदी प्रतिनिधी माऊली धु॑डरे)
आळंदी : शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्हे, तर कायमच वेगळ्या, सामाजिक व भक्तिमय पद्धतीने साजरा केला जातो. वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव न मानता सेवा, भक्ती आणि समाजकार्य यांचा संगम त्यांनी सातत्याने जपला आहे.
प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५० सिटरच्या दोन बस व सहा फोर व्हीलर वाहनांतून शिवसैनिक, भाविक व कार्यकर्ते शनिशिंगणापूर या पवित्र देवस्थानास जात असतात. या सर्व भाविकांच्या प्रवास, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था नियोजनबद्ध व शिस्तीत केली जाते.
शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवांचा विधिवत अभिषेक व महाआरती करण्यात येते. भक्तिमय वातावरणात सर्व भाविक एकत्र येऊन अभिष्टचिंतन सोहळा साजरा करतात. हा उपक्रम केवळ एकदाचा नसून, अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.
याचबरोबर गरिबांना अन्नदान, वेदपाठशाळेमध्ये वेदपाठकांकडून शुभेच्छा स्वीकारणे, तसेच अनाथ मुलांसाठी महाप्रसाद व अन्नदान असे विविध सेवाभावी उपक्रम दरवर्षी राबविले जातात. त्यामुळे हा सोहळा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
राहुल चव्हाण यांच्या या उपक्रमाचे शिवसैनिक, भाविक व नागरिकांकडून कौतुक होत असून, “वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा सकारात्मक संदेश कायम दिला जातो.).

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























